शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

आत्मबोध 1

 40. दुःख/पाप याबद्दल भीती वाटणे, जिज्ञासा, मुमुक्षत्व, साधक, सिध्द, संत, गुरु हे परमार्थ मार्गातील टप्पे आहेत.  
आपण कोणत्या टप्प्यावर आहोत याचे आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे.

41. वस्तु आणि भौतिक साधने सुखाची निर्मिती करत नाहीत तर सुख हे मानवी मूल्यांच्या जोपासनेतूनच निर्माण होते.

42. वाचन, लेखन, श्रवण आणि दर्शन ही ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक अंगे आहेत.

43. स्वध्यान हेच सर्वश्रेष्ठ ध्यान आहे.

44. तेच महत्वपूर्ण आहे, जे स्वतःजवळ आहे.

45. स्वानुभव लेखनातून स्वदर्शन घडते.

46. आपल्या गुणांचे प्रदर्शन करत राहण्यापेक्षा शिकण्यात अधिक आनंद आहे.

47. निव्वळ युक्तिवाद करून कोणाचेही मत बदलता येऊ शकत नाही.

48.एकदा का स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद मिळायला लागला की मग आनंदासाठी बाह्य घटकांची आवश्यकता राहत नाही.

49.वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा हे वाणीचे चार प्रकार आहेत.

50. मीच एकटा दुःखी आहे असे वाटणे हा निव्वळ एक आभास आहे.
                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा