30. आत्म्याशी एकरूप झाल्याखेरीज कलाकृती निर्माण होत नाही.
31. सात्विक आनंद हे भारतीयांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
32. एक सत्कर्म अनेक सुखोपभोगांपेक्षा श्रेष्ठ आहे .
33. मोठेपण आणि अभिमान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
34. ज्याला स्वतःत बदल करता येतो, त्याच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडले जातात.
35. दुःखाचा लवलेशही नाही अशी जागा म्हणजे स्वध्यान.
36. वाक्याला भावार्थ, शब्दार्थ आणि विपरीत असे तीन प्रकारचे अर्थ असतात.
37. चित्र, साहित्य, संगीत, परमार्थ विषय कोणताही असो त्यात सातत्याने खोली गाठणे आवश्यक आहे.
38.आत्मज्ञान म्हणजे स्वतःविषयी सर्व ज्ञान प्राप्त करणे हेच मनुष्याचे ध्येय आहे.
39. आयुष्यात सुंदर क्षणांची वाट बघत बसण्यापेक्षा आलेला क्षण अधिक सुंदर बनवता येणे महत्वाचे आहे.
40. दुःख/पाप याबद्दल भीती वाटणे, जिज्ञासा, मुमुक्षत्व, साधक, सिध्द, संत, गुरु हे परमार्थ मार्गातील टप्पे आहेत.
आपण कोणत्या टप्प्यावर आहोत याचे आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा