मंगळवार, ४ मार्च, २०२५

आत्मबोध 1

 1. श्वसनावर लक्ष केंद्रित करणे हे मनःशांतीचे एक सशक्त साधन आहे.

2. सातत्याने निर्माण होणारे दुःख ही मुख्य समस्या मानवी जीवनात आहे.

3. ज्ञान मिळवणे हा दुःख नाहीसे करण्याचा एकमेव उपाय आहे.

4. देहाचा अभिमान हे मनुष्याच्या अज्ञानाचे मुख्य लक्षण आहे.

5. आपले अज्ञान हेच आपल्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

6. मी देह नसून आत्मा आहे याची जाणीव होणे हेच खरे ज्ञान आहे.

7. जोडले जाणे म्हणजे योग.

8. मी कोण आहे हा एक प्रश्न प्रत्येक जीवाचे मूलतत्त्व आहे.

9. श्वसन, प्राशन,  निद्रा, ग्रहण आणि उत्सर्जन  या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत.

10. स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे हा या जगात महान बनण्याचा एकमेव मार्ग आहे.
               

शनिवार, १ मार्च, २०२५

आत्मबोध 1

 11. गुरु शिष्याला त्याच्या स्वस्वरुपाची जाणीव करून देतात.

12. विश्व स्वयंचलित आहे.

13. चुकीचे रस्ते फार दूर जात नाहीत.

14. जगात सर्वत्र द्वैत आढळते.

15. या जगात सर्व प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होत राहते, नव्याने काहीच घडत नाही.

16. लोक चमत्काराच्या मागे धावतात.

17. साधक स्वतःच्या क्षमता वाढविण्यात व्यस्त असतात.

18. शिकण्याची संधी नेहमीच उपलब्ध असते.

19. सर्व गरजा पूर्ण करता येऊ शकतात मात्र सर्व इच्छा पूर्ण करता येऊ शकत नाहीत.

20. भौतिक जीवनातील निरर्थकता ध्यानात येण्याला वैराग्य असे म्हणतात.